Blog Views

श्रीसाईनाथांची अभय वचने

श्रीसाईनाथांची अभय वचने


शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।
टळती अपाय सर्व त्याचे । || १ ||


माझ्या समाधीची पायरी चढेल ।
दुःख हे हरेल सर्व त्याचे । || २ ||


जरी हे शरीर गेलो भी टाकून ।
तरी भी धावेन भक्तासाठी || ३ ||


नवसास माझी पावेल समाधी ।
धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||


नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य ।
नित्य ध्या प्रचीत अनुभवे || ५ ||


शरण मज आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||


जो जो मज भजे जैसा जैसा भावे ।
तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||


तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।
नव्हे हें अन्यथा वचन माझे || ८ ||


जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।
मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ ||


माजा जो जाहला काया वाचा मनी ।
त्याचा मी ऋणी सर्वकाल || १० ||


साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।
झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs