श्रीखंडेरायाची दोन ध्याने प.प. वासुदेवानंदसरस्वती
स्वामीमहाराजांच्या हस्ताक्षरांत लिहिलेली आहेत
|| अश्वारूढं शिवं साक्षान्मणिमल्लारिमर्दनं ||
|| महालसापतिं देवं खंडराजं नमाम्यहं ||१||
|| भूभारोत्तारणार्थाय अवतीर्ण स्वयं शिवम ||
|| वन्दे महालसाकान्तं मणिमल्लारिमीश्वरं ||२||
|| इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं
श्री खंडोबाचा अभंग ||
।।देव खंडेराव महालसाधव ।जेजोरीचा देव भावलभ्य ।।१।।
।।लभ्य नसे योगा तो हा भक्तियोगा । गम्य घे अभंगा अंगा देव ।।२।।
।।देव दुःखहारी मणि मल्लारी । निजभक्तां तारी वारी क्लेश ।।३।।
।।महालसाकांत हर मूर्तिमंत । खंडोबा महंत ख्यात देवीं ।।४।।
जो इंद्रचंद्रसूर्यमुखसुरासुरार्चित । खंडेश्वर परिहरि दर धर सुतांचित ।।ध्रु ।।
जो एक लोकशोकदुखःहारक । हरि ज्याचें यश नाकेशकेशवादिक ।।
गाती दिनरात दीनहीनतारक । तो हा स्मरहा पुरहा सुरवरेश्वर ।।१।।
जेजोरी गिरिशिखरीं नित्य वसतसे । नच दुसरे स्थान बरें दिसतसें ।।
तेथें भव साक्षाच्छिव इष्ट देतसे । भावें जावें गावें तारितो हर ।।२।।
त्या सांबा खंडोबा पाहुं जाति जे । त्यांचे काम पूर्ण होति चित्तिं असति जे ।।
न कदापी येत मनीं आणि जे दुजें । परिसा ऐसा सहसा वरद हा हर ।।३।।