नैवेद्य म्हणजे काय?
देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे
नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य
पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.
‘तंत्रसार’ या
ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
त्यात म्हटले आहे की,
‘‘नैवेदनैय असेल ते प्रशस्त आणि पवित्र
असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच ‘नैैवेद्य’ म्हणतात.
भक्ष्य – गिळता
येण्यासारखे,
भोज्य – चावूनै
खाता येईल असे,
लेह्य – चाटता
येईल असे,
पेय – पिता
येईल असे आणि
चुष्य – चोखता
येईल..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करूनै त्याला
समर्पावा.’’
तंत्रासारातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-
नैवेदनैय यद द्रव्यं,
प्रशस्तं प्रयतं तथा
तद भक्ष्यार्हम पंचविधं
नैवेद्यमिति कथ्यते।
भक्ष्यं, भोज्यं
च लेह्यं च,
पेयं चुष्यं च पंचममे
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै नैिवेदयेत
विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा (तिखट सांजा नैाही. गोडाचा सांजा
म्हणजेच शिरा.) किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दूध आणि फळे सर्व देवांनैा प्रिय आहेत.
नैैवेद्य कसा दाखवतात?
» नैवेद्य दाखवतानैा देवापुढे
चौकोनैी मंडळ करूनै त्यात पुनै्हा ७ असे चिनै्ह करूनै मग त्याच्यावर नैवेद्याचे
ताट, भांडे, पात्र ठेऊनै मग नैवेद्य
दाखवावा.
» या पात्रावर तुलसीपत्र ठेऊनै
मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
» तुलसीपत्र ठेवले की, ‘माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे’, हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
» सोन, रूपे,
तांबे, दगड, कमलपत्र आणि
यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊनै नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
» नैवेद्य देवाच्या उजव्या
हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.
» तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनैी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. म्हणजे यांनैी
नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.
» मग नैवेद्याचे पात्राभोवती
डावीकडूनै उजवीकडे असे आपल्या उजव्या हातानैे पाणी सोडत मंडल करत यावे.
» नंतर ‘‘प्राणाय
स्वाहा, अपानैाय स्वाहा, व्यानैाय
स्वाहा, उदानैाय स्वाहा, समानैाय
स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा’’असे म्हणत
म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात आपल्या
हृदयाजवळ असावा, मान झुकलेली असावी. असे करून झाले की,
‘मध्ये पानैयं समर्पयामि’असे म्हणून उदक
द्यावे. म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
मग पुन्हा वरचा हा ‘स्वाहा’
मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या
देवतेचे नाव घेत(इथेविशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी अमुक देवताभ्यो म्हणत
आहे) ‘अमुक देवताभ्यो नैम: नैवेद्यं समर्पयामि’असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे. [उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा
पुरण, वरण, पक्वनै्नै, भाज्या, कोिशबिरी इत्यादी षडरस अनै्नैाचा असावा.
नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
नैैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे ‘प्रसादात’ रूपांतर होते. त्यामुळे मी
देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि
तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो
लगेच स्वत:ही खाऊ नैये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर,
माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नैाही
नैा हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नैकोच.
आपल्याला प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नैसेल तर आपण
मानैस पूजा करूनै त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो आणि
या मानैस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण
त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊनै जातो.
मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते
आणि मनैाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवनैच पवित्र, सुगंधी बनैूनै जाते.
आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर
आहे हे आकळायला लागते.